आणि ‘शपथ वाहून’ तो (परमेश्वर) कोणाला म्हणाला की, ‘तुम्हीं माझ्या विसाव्यात येणार नाहीं’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाहीं? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाहीं. (इब्री 3:18-19)
जरी इस्राएली लोकांनी तांबड्या समुद्राचे पाणी दुभागतांना पाहिले आणि ते कोरड्या भूमीवरून चालत गेले, तरीही ज्या क्षणी त्यांना तहान लागली, त्या क्षणी त्यांची अंतःकरणें परमेश्वराविरुद्ध कठोर झालीं आणि तो त्यांची काळजी घेईल असा भरवंसा त्यांनी केला नाहीं. ते त्याच्याविरुद्ध आरडाओरड करू लागले आणि म्हणाले की मिसर देशातील जीवन चांगले होते.
अंत:करणाच्या अशा कठोरतेवर आळा घालणेंच इब्रीकरांस पत्र लिहिण्या मागचा हेतू होता. किती तथाकथित ख्रिस्ती परमेश्वरावर विश्वासाची सुरूवात करतात. ते ऐकतात की त्यांची पापे क्षमा केली जाऊ शकतात आणि नरकापासून त्यांचा बचाव होऊन ते स्वर्गात जाऊ शकतात. आणि ते म्हणतात: “यांत तर मी काहींच गमावत नाहीं? मग मी विश्वास ठेवायला काय जाते.”
मग एका आठवड्यात किंवा महिन्यात किंवा वर्षात अथवा दहा वर्षानंतर, परीक्षा येते – अरण्यात पाणी नसण्याचा काळ. मन्ना खाऊन-खाऊन आलेला किळस. आणि मिसर देशातल्या क्षणीक सुखांसाठीं मनांत गुप्तपणें वावरणारी इच्छा, जसे गणना 11:5-6 म्हणते, “मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणें काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस कांहींच पडत नाहीं.”
या परिस्थितीत राहणें भयावह आहे – ख्रिस्ताठायीं आणि त्याच्या वचनात आणि प्रार्थनेत आणि उपासनेत आणि सुवार्ता प्रचारात आणि परमेश्वराच्या गौरवासाठीं जगण्यात आता तुम्हांला कुठलीही रूचि वाटत नाहीं असें तुम्हांला दिसून येते. आत्म्याच्या गोष्टींपेक्षा या जगाची क्षणिक सुखे जास्त आकर्षक आहेत असें आता दिसून येते.
जर ही तुमची परिस्थिती असेल, तर मी तुम्हांला विनंती करतो की या वचनात पवित्र आत्मा जे बोलत आहे ते तुम्हीं ऐकावे. “ते अविश्वासामुळे प्रवेश करू शकले नाहींत!” परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. तुमचे अंतःकरण कठोर करू नका. पापाच्या धोक्याबाबत जागृत व्हा. तुम्हीं पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा, आणि त्याच्यामध्ये तुम्हीं जो पत्कर केलेला आहे वा जी आशा धरली आहे ते दृढ धरून राहा.
आणि जर तुम्हीं अजूनही देवावर विश्वास ठेविलेला नसेल, तर त्याच्यावर तुमची आशा धरा. पापापासून आणि स्वतःवर अवलंबून राहण्यापासून मागे फिरा आणि थोर तारणकर्त्यावर तुमचा विश्वास असू द्या. यां गोष्टी यासाठीं लिहिण्यात आल्या आहेत की तुम्हीं विश्वास धरावा आणि धीर धरावा, आणि जिवंत राहावें.