ArchivesSolid Joys

10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही

Alethia4India
Alethia4India
10 फेब्रुवारी : तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही
Loading
/

ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. (इब्री 11:15-16)

विश्वास हा देवानें प्रतिज्ञा केलेल्या भविष्याकडे पाहतो आणि त्याची “उत्कंठा” धरतो. “पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.” यावर क्षणभर विचार करा.

असे बरेच लोक आहेत जे तारणदायी विश्वासाचे स्वरूप बदलून त्याचे कार्यकारी महत्व कमी करतांत, म्हणजे ते त्याची अशी व्याख्या करतांत कीं विश्वास हा जणू मनुष्याच्या स्वतंत्र इच्छेनें घेतलेला निर्णय आहे, ज्यांमध्यें तो कशाची उत्कंठा करतो किंवा कशाचा शोध घेतो यांत कांहीच बदल घडून येत नाहीं. परंतु बायबलमध्यें दिलेल्या महान विश्वासाचा अध्याय, इब्री 11, यांत असलेल्या या वचनाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं विश्वासाने जगणे आणि मरणे याचा अर्थ नव्या उत्कंठा धरणे आणि नव्या तृप्तींचा शोध घेणे असा होतो.

वचन 14 म्हणते कीं प्राचीन काळातील पवित्र लोक (ज्यांची इब्री 11 मध्ये त्यांच्या विश्वासाबद्दल प्रशंसा केलीं जात आहे)   स्वतःच्या अशा देशाचा शोध करित होते जे ह्या जगापेक्षा वेगळे आहे. आणि वचन 16 म्हणते कीं ते वर्तमान पृथ्वीवरील जीवन जे कांही देऊं करते त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीची उत्कंठा करित होते : “ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात.”

त्यांना देवानें इतके घट्ट पकडले होते कीं, देवावांचून त्यांना इतर कोणत्याहि गोष्टींत समाधान नव्हते.

तर मग, खरा तारणदायी विश्वास हा आहे: देवाची अभिवचने दुरून पाहणे, आणि आपण जी मूल्ये धरतो त्यांत बदल घडवून आणणे जेणेकरुन आपण जगाने जे काही देऊं केले आहे त्यापेक्षा अधिक देवाच्या अभिवचनांची उत्कंठा धरतो आणि त्यांचा शोध घेतो आणि त्यांवर विश्वास ठेवतो.

9 फेब्रुवारी : धन, यौन-क्रीडा आणि सामर्थ्य,यांपेक्षाउत्तम

Alethia4India
Alethia4India
9 फेब्रुवारी : धन, यौन-क्रीडा आणि सामर्थ्य,यांपेक्षाउत्तम
Loading
/

म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. (इब्री 10:35)

आपण देवाचे श्रेष्ठत्व ह्या जगाने आपल्याला जें काही देऊ केलें आहे त्यापेक्षा मोठे प्रतिफळ मानावें. जर आपण देवाचे श्रेष्ठत्व मोठे प्रतिफळ मानले नाही तर मग आपणहि नाश होत असलेल्यां लोकांसारखे ह्या जगावर प्रीति करणारे व त्यांच्यासारखे जीवन जगणारे ठरू.

म्हणून, हें जग ज्यां गोष्टींकडे वेड्यासारखे धावते त्यां गोष्टी विचारात घ्या आणि तुलनेने देव किती चांगला आणि स्थिर आहे यावर विचार करा. धन किंवा यौन-क्रीडा किंवा कोणतेहि सामर्थ्य घ्या आणि मृत्यूच्या संबंधात त्यांवर विचार करा. मृत्यू या सर्वांना गिळून टाकील. जर तुम्हीं त्यासाठीं जगत आहां, तर तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आणि जे थोडके मिळेल तेहि तुम्हीं गमावाल.

पण देवाचे धन कल्पनेपलीकडे उत्तम आहे आणि ते टिकून राहते. ते मृत्यूलाहि पार करते. हे पैशापेक्षा उत्तम आहे कारण देव सर्व पैशाचा स्वामी आहे आणि तो आपला पिता आहे. आम्हीं त्याचे वारस आहोत. “सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (1 करिंथकरांस 3:22-23). अहाहा!

हे यौन-क्रीडेपेक्षा उत्तम आहे. येशूनें कधीही लैंगिक संबंध ठेवले नाहीत, आणि तो मनुष्यांमध्यें सर्वात सिद्ध आणि पूर्ण मानव होता. यौन-क्रीडा ही छाया आहे — एक प्रतिमा — एका मोठ्या सत्याची, नातेसंबंधाची आणि आनंदाची छाया जिच्या तुलनेंत सर्वात रोमांचक यौन-क्रीडा देखील जांभई दिल्यासारखी वाटेल.

देवाचे प्रतिफळ अधिकार किंवा सामर्थ्य यांपेक्षा उत्तम आहे. सर्वसमर्थ देवाची संतती व्हावे यांपेक्षा कोणतीही मानवी-शक्ती मोठी नाही. “आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना?” (1 करिंथकरांस 6:3). “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन ” (प्रकटीकरण 3:21).

या विषयावर आपण आणखी पुष्कळ बोलूं शकतो, कारण हा विषय वाढतच जाईल. जग आपल्याला जे काही देऊं पाहते, देव अधिक श्रेष्ठ आणि सनातन आहे.

कोणतीहि तुलना नाही. देव विजयी होतो – प्रत्येक वेळी. तर प्रश्न हा आहे: तो आमच्या जवळ आहे का? काय आपण या मती गुंग जगाच्या थडग्यांतून जागे होऊन बाहेर निघून जे खरोखर वास्तविक, असीम मौल्यवान आणि सार्वकालिक आहे त्याकडे पाहणार आणि त्यावर विश्वास ठेवणार आणि त्यांत आनंद मानणार आणि त्यावर प्रीति करणार का?

8 फेब्रुवारी : तुम्हीं देव नाहीं याचा तुम्हांला आनंद वाटतो का?

Alethia4India
Alethia4India
8 फेब्रुवारी : तुम्हीं देव नाहीं याचा तुम्हांला आनंद वाटतो का?
Loading
/

अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा! (स्तोत्र 96:7)

जेव्हां स्तोत्रकर्ता “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें म्हणतो तेव्हां तो येथें त्याला आलेल्या अनुभवाचे किमान कांही प्रमाणांत वर्णन करित आहे. आपण “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणतो” तेव्हां आपण नेमके काय करत असतो?

प्रथम, देवाच्या कृपेने, आपण देवाकडे चित्त लावतो आणि तो किती सामर्थ्यवान आहे हे पाहतो. आम्हीं त्याच्या सामर्थ्यकडे निरखून पाहतो. मग आम्हीं त्याचे सामर्थ्य किती महान आहे ह्याविषयी साक्ष देतो. आम्हीं त्याचे महत्व लक्षात घेऊन जसे कौतुक केले पाहिजे तसे ते करतो.

त्याचे सामर्थ्य अद्भूत असल्याची आपल्याला जाणीव होते. पण ती अद्भुत गोष्ट ज्यांमुळें आपण इतके आश्चर्यचकित होतों कीं आपल्या तोंडून “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें शब्द उसळून निघतांत- – ती गोष्ट म्हणजे ही कीं आपल्याला विशेषकरून याचा आनंद होतो कीं ही सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमची नाही.

तो अति सामर्थ्यवान आहे आणि आपण दुर्बळ आहों या वस्तुस्थितीत आम्हीं स्वतःला सामर्थ्यवान समजतो. हे सत्य अशाप्रकारे आहे हे आपल्याला आवडते. देवाच्या सामर्थ्याचा आपल्याला हेवा वाटत नाहीं. आम्हीं त्याच्या सामर्थ्याचा लोभ करित नाहीं. सर्व सामर्थ्य त्याचे आहे यांत आम्हीं आनंदाने भारावून जातो.

आपले संपूर्ण व्यक्तित्वमत्व, म्हणजे जे कांही मी आहे ते सर्व, स्वतःतून बाहेर निघून त्याच सामर्थ्याकडे निरखून पाहण्यात आनंदित होते – जणू काही आपण आपल्या बाजूच्या धावपट्टीवर धावत असलेल्या धावपटूचा विजयोत्सव साजरा करतो ज्याने आपल्याला शर्यतीत पराभूत केले होते आणि आपण आपल्या पराभवावर दांत खात बसण्याऐवजी त्याच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यात आपला सर्वात मोठा आनंद मानतो.

जेव्हां आपली अंतःकरणे स्वतःच्या शक्तीवर अभिमान बाळगण्याऐवजी किंवा स्वतःची प्रौढी मिरविण्याऐवजी देवाच्या सामर्थ्याचे वाखाणे करण्यासाठीं स्वतःहून फुटून पडतात तेव्हां आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन काय आहे तें समजते. आपल्याला  एका अद्भुत सत्याचा शोध लागतो: आपण देव नाहीं हे सत्य अत्यंत समाधान देणारे आहे, म्हणून देव बनण्याच्या सर्व व्यर्थ कल्पना किंवा इच्छा यांचा आम्हीं त्याग करतो.

देवाच्या सामर्थ्यावर चिंतन केल्यांमुळें आपल्यामध्ये एक अशी जाणीव निर्माण होते कीं देवानें हें विश्व पुढील हेतूनें निर्माण केलें आहे: ह्यासाठीं कीं, आपल्याला आपण देव नाहीं, तर देवाचे देवपण – म्हणजे देवाचे सामर्थ्य- याचे कौतुक करण्याचा अत्यंत समाधानकारक आनंद घेता यावा. ह्या सर्वसमर्थाचे वाखाणे हाच सर्व गोष्टींचा अंतिम व पूर्णानंद देणारा शेवट (निष्कर्ष) आहे याची अनुकूल जाणीव आपल्या अंत:करणांत कायम स्थिरावते.

कोणतेहि सामर्थ्य आपल्यापासून आलें आहे अशी फुशारकी मारण्याचा क्षुल्लकहि मोह झाल्यांस आपण थरथरतो. यापासून आपले रक्षण करण्यासाठीं देवानें आपल्याला दुर्बल असें भांडे बनविले आहे: “ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने कीं, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे” (2 करिंथ 4:7).

अहाहा, काय ही प्रीति, कीं देव त्याच्या सामर्थ्याचे वाखाण करण्याचा जो सार्वकालिक शिखर आहे त्या जागी आपण आपल्या स्वतःचा अभिमान बाळगण्याचा व्यर्थ प्रयत्न करूं नये म्हणून आपले संरक्षण करतो! देव असण्या ऐवजी देवाकडे पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाहीं!

7 फेब्रुवारी : शेवटच्या घटकेचेपुनरुज्जीवन

Alethia4India
Alethia4India
7 फेब्रुवारी : शेवटच्या घटकेचेपुनरुज्जीवन
Loading
/

“अहों येशू, आपण आपल्यां राजाधिकारानें याल तेव्हां माझी आठवण करा.” (लूक 23:42)

आपल्या आशेला जिवे मारणाऱ्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकीं एक म्हणजे ही निराशा कीं आपण स्वतःला बदलण्यासाठीं इतके दिवस प्रयत्न केलें, तरी यशस्वी होऊं शकलों नाहीं.

तुम्हीं मागे वळून पाहता आणि विचार करतां : माझ्यां यां सर्व धावपळीचा काय उपयोग? जीवनाच्या शेवटल्या घटकेला जरी माझे पुनरुज्जीवन झालें, तरी नवी उत्पत्ती म्हणून नव्यां मार्गाने जीवन जगण्यासाठीं माझ्याकडे इतका अल्प काळ असेल कीं इतक्या वर्षांच्या अपयशाच्या तुलनेत यां अल्पकालिक नव्या जीवनाचा फारसा फरक पडणार नाही.

एकेकाळचा दरोडेखोर (म्हणजे येशूच्या बाजूला वधस्तंभावरील चोर) त्याच्या आत्म-परिवर्तनानंतर पुढील कांही तास जगला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो बदलला होता. तो त्यां वधस्तंभावर असतांना त्यानें एक नवी वृत्ती व पश्चातापांस शोभेल असें नवें सत्कृत्य म्हणून एक नवा मनुष्य म्हणून जगला (आता तो ख्रिस्ताची निंदा करित नव्हता). पण त्याचे 99.99% आयुष्य वाया गेले. नव्यां जीवनाचे ते शेवटचे दोन तास महत्त्वाचे होते का?

होय, त्यांचं प्रचंड महत्त्व होते. एकेकाळी दरोडेखोर असलेल्या ह्या लुटारूला, आपणां सर्वांप्रमाणेच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट व्हावें लागेल ह्यासाठीं कीं त्यानें आपल्या जीवनांत केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा. “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झालें पाहिजे, ह्यासाठीं कीं, प्रत्येकाला, त्यानें देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो” (2 करिंथ 5:10). त्या दिवशी त्याचे जीवन त्याच्या नवीन जन्माची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकतेची साक्ष कशी देईल? ख्रिस्तामध्ये त्याचे जीवन नवे झालें होते याची खात्री कशी केलीं जाईल?

शेवटचे तास तो वृत्तांत कथन करतील. हा मनुष्य नवा होता. त्याचा विश्वास खरा होता. तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे. तो ख्रिस्ताचे नीतिमत्व असा झाला आहे. त्याच्या पापांची क्षमा झालीं आहे.

शेवटचा न्याय होईल त्यांवेळी त्याच्या तारणाची ती शेवटची घटका ह्यांच गोष्टीची साक्ष देईल. तो बदलला आहे! आणि त्याचा बदल महत्त्वाचा ठरला. देवाच्या कृपेच्या सामर्थ्याची आणि त्याच्या विश्वासाची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकात्मतेची ती एक सुंदर साक्ष होती आणि कायम असणार.

आता आपण बदललेल्या जीवनाच्या आपल्यां मूळ संघर्षाकडे परत येऊ. मी असे म्हणत नाही कीं जे विश्वासणारे परिवर्तनाच्या बाबंतीत संघर्ष करतांत तें त्यां दरोडेखोरा प्रमाणें तारलेलें नाहींत. मी फक्त असे म्हणत आहे कीं जीवनाच्या शेवटच्या वर्षांचे व शेवटच्या तासांचे महत्त्व आहे.

जर आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या अगदी एक टक्के शिल्लक असलेल्या घटकेतहि, आपण आपल्या पापी प्रवृत्तीवर किंवा अधर्मावर विजय मिळविला जें आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलवर होते किंवा दीर्घकाळापासून होते, तर ही गोष्ट वर्तमान समयी आम्हांवर झालेंल्या कृपेच्या सामर्थ्याची एक सुंदर साक्ष ठरेल; आणि ख्रिस्तावर आपण विश्वास ठेविला आहे आणि त्याच्याबरोबर एकरूप झालो आहोंत ही वास्तविकता शेवटचा न्याय केला जाईल त्यावेळी साक्षीदार ठरेल.

ह्यास्तव, तुम्हीं जे संघर्ष करित आहां तें तुम्हीं धीर धरा. विनंत्या करित रहा, शोध करित रहा, दार ठोकत रहा. ख्रिस्ताकडे पाहत असा. अगदी शेवटच्या घटकेंत दरोडेखोरांचे तारण करून जर देवाला गौरव मिळत असेल, तर तुम्हीं जे वर्षानुवर्षे पुनरुज्जीवन मिळविण्यासाठीं झटत होता ते देण्यासाठीं तो आत्तापर्यंत का थांबून होता ह्यामागे निश्चितच त्याचे कांही हेतू आहेत.

6 फेब्रुवारी : येथें निंदा, तेथें प्रतिफळ

Alethia4India
Alethia4India
6 फेब्रुवारी : येथें निंदा, तेथें प्रतिफळ
Loading
/

जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. (स्तोत्र 1:3)

स्तोत्र 1:3 मधील हे अभिवचन कशा प्रकारे ख्रिस्ताकडे इशारा करते?

अभिवचन असें म्हणते, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” नीतिमान लोक जे काही हाती घेतांत ते सर्व सिद्धीस जाते. हा अति भाबडेपणा आहे, कीं निर्विवाद सत्य?

आपल्याला ह्या जीवनांत दुष्टांची नक्कीच भरभराट होतांना दिसून येते कीं. “जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस!” (स्तोत्र 37:7). “….. दुराचारी संपन्न झालें आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे” (मलाकी 3:15).

तर नीतिमानांना मात्र ह्या जीवनात पुष्कळ संकटांतून जावें लागते आणि त्यांच्या चांगुलपणाचे प्रतिफळ त्यांच्याशी गैरवर्तन करून दिले जाते. “जर आम्हीं आपल्या देवाचे नाव विसरलो असतो….., तर देवानें हे शोधून काढले नसते काय?  तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात” (स्तोत्र 44:20-22). स्वतः स्तोत्रकर्त्यांना याची जाणीव होती. आम्हीं एखाद्या अशा गोष्टी विरोधांत आरडाओरडा करित नाहींये ज्या विषयीं त्यांना पूर्वीपासून कल्पना नव्हती.

यास्तव, जेव्हां स्तोत्रकर्ता म्हणतो, “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते,” तो त्याचा अति भाबडेपणा नाही. तर ज्यां गोष्टी त्याला ह्या जीवनांत अंधुक दिसून येतांत त्याद्वारे तो मृत्यूनंतरच्या जीवनाकडे इशारा करतो, जिथे आपण केलेल्या सर्व गोष्टींचे खरे प्रतिफळ – म्हणजे खरी समृद्धी प्रकट केलीं जाईल.

पौलाची विचारसरणी हींच होती.

प्रथम, तो मृत्यूवर ख्रिस्ताच्या विजयाचे स्तुतीगान करतो. “अरे मरणा, तुझी नांगी कोठे?’ . . जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो” (1 करिंथ 15:55, 57).

मग, तो असा अर्थ काढतो कीं, या विजयामुळेच, विश्वासनाऱ्यानी केलेले प्रत्येक श्रम सिद्धीस जाईल. “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्हीं जाणून आहात” (1 करिंथ 15:58). जेव्हां एखादी गोष्ट व्यर्थ जात नाहीं, म्हणजेच ती सिद्धीस जाते.

ज्यां अर्थी ख्रिस्त आमचा प्रतिस्थापक म्हणून मरण पावला म्हणून, त्यां अर्थी त्यानें या गोष्टीची खात्री दिली कीं शेवटी प्रत्येक सत्कृत्य सिद्धीस जाईल. “प्रत्येक जण…… जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल” (इफिस 6:8). “जेव्हां लोक तुमची निंदा करतील तेव्हां तुम्हीं धन्य. . . . आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” (मॅथ्यू 5:11-12). येथें निंदा केलीं. स्वर्गांत प्रतिफळ मिळेल.

जुन्या करारात जी गोष्ट अति भाबळेपणाची वाटते (“जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते”) ती ख्रिस्ताच्या कार्याकडे आणि पुनरुत्थानाच्या निर्विवाद सत्याकडे इशारा करते. कॅथरीना फॉन श्लेगेलच्या त्या महान भजनातील शब्दांप्रमाणे, “हें माझ्या जीवा, शांत बैस, हें माझ्या जीवा शांत बैस: तु तुझ्या येशूकडून भरून पावशील / तो सर्व आपल्या पूर्णत्वांतून देतो.”

5 फेब्रुवारी : सेवेचा मुख्य हेतू

Alethia4India
Alethia4India
5 फेब्रुवारी : सेवेचा मुख्य हेतू
Loading
/

परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकीं’ आपण नाहीं; तर जिवाच्या तारणासाठीं ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकीं’ आहों. (इब्रीलोकांस 10:39)

प्रेमाची तत्कालीन किंमत काय आहे त्यांकडें पाहूं नका आणि देवानें जीं अढळ अशी श्रेष्ठ अभिवचनें दिलीं त्यांवर विश्वास ठेवण्यापासून माघार घेऊं नका. जर तुम्हीं माघार घेणारें झालांत, तर तुम्हीं केवळ अभिवचनांनाच मुकणार नाहीं तर तुमचा नाशहि होईल.

आपण माघार घेतो कीं विश्वासांत टिकून राहतो हा जीवन-मरणाचा विषय आहे. आपण जें गमावतो तें केवळ असें कांही प्रतिफळ नाहीं जें तारणाबरोंबर अतिरिक्त दिलें जातें. इब्री 10:39 म्हणते, “ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकीं’ आपण नाहीं.” हा सर्वकाळासाठीं केला जाणारा शेवटचा न्याय आहे.

म्हणून, आम्हीं एकमेकांना बजावून सांगतो: माघार घेऊं नका. ह्या जगावर प्रीति करूं नका. इतका मोठा धोका नाहीं असा विचारहि करूं नका. आपल्या अंत:करणांत देवाच्या अभिवचनांना पापाच्या अभिवचनांपेक्षा मोठी गोष्ट न मानल्यांस जे भयंकर परिणाम भोगावें लागतील त्याची भीती बाळगा. इब्री लोकांस 3:13-14 म्हणते, “जोपर्यंत “आज” म्हटलेंला वेळ आहे तोपर्यंत तुम्हीं एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा कीं, पापाच्या फसवणुकींने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहों.”

परंतु मुख्यतः आपण अभिवचनांचे मोल काय आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करणें आणि ख्रिस्तानें आपल्यासाठीं विकत घेतलेलें प्रतिफळ किती मोठे आहे त्याचे मोल इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक समजणे व एकमेकांना देखील तसा बोध करणें अगत्याचे आहे. इब्री 10:35 काय सांगते हें आपण एकमेकांना सांगितलें पाहिजे: “म्हणून आपलें धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.” आणि मग तें प्रतिफळ किती मोठे आहे हें आपण  एकमेकांना दाखवून दिलें पाहिजे.  

उपदेशाची प्रमुख विषयवस्तु हींच आहे, आणि मंडळी लहान असों वां मोठी, सर्व प्रकारच्या सेवेचा मुख्य हेतू हांच आहे: ख्रिस्तानें जे विकत घेतलें आहे त्याचे प्रतिफळ किती मोठे हे त्या लोकांना जें त्या प्रतिफळाला जगापेक्षा अधिक महत्त्व देतील, दाखवून देणें. लोकांनी ते पाहावें आणि त्याची चव घ्यावी म्हणून त्यांची मदत करणें, ह्यासाठीं कीं त्यांना जी शांती मिळेल त्याद्वारे आणि त्यांच्या अंतःकरणातून उपकारस्तुतीचा जो यज्ञ सादर केला जाईल त्याद्वारे देवाचे श्रेष्ठत्व प्रकाशमान व्हावें.

4 फेब्रुवारी : दुःखाचे पाच उपयुक्त उद्देश

Alethia4India
Alethia4India
4 फेब्रुवारी : दुःखाचे पाच उपयुक्त उद्देश
Loading
/

मी पीडित होण्यापूर्वी भटकत असें, पण आतां मी तुझें वचन पाळत आहे. (स्तोत्र 119:67)

हें वचन प्रकट करते कीं देव आपल्याला दुःख देतो ते हेतूनें कीं आपण त्याचे वचन पाळण्यांस शिकावे. हा हेतू कसा सिद्धीस जातो? दुःख आपल्याला देवाचे वचन शिकण्यास आणि त्याचे पालन करण्यास कसे उपयुक्त ठरते?

आम्हांवर होत असलेल्यां या महान दयेचे असंख्य अनुभव असल्या कारणानें या प्रश्नांची असंख्य उत्तरे आहेत. परंतु खाली पाच उत्तरं आहेत:

1. दु:ख आमच्यांत असलेली जीवनाविषयीची चंचल वृत्ती किंवा मानसिकता दूर करते आणि आपल्याला जीवनाविषयी अधिक गंभीर बनवते, म्हणजे आपल्या मनाचा कल देवाचे वचन जितके गंभीर आहे तितका त्यां गांभीर्याशी अधिक सुसंगत बनतो. आणि हें लक्ष्यांत ठेवा: देवाच्या पुस्तकात एकही पान चंचल वृत्तीचे नाहीं.

2. दु:ख आपले सर्व जगिक आधार काढून टाकते व आपण देवावर अधिक आणि अधिक विसंबून राहावे यासाठीं भाग पाडते, ज्यामुळें आपण त्याच्या वचनाशी समरूप व्हावें हा त्याचा उद्देश सिद्धींस जातो. कारण आपण देवावर आशा ठेवणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे असावे हांच त्याच्या वचनाचा उद्देश आहे. “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणांस शिक्षण मिळण्याकरितां लिहिलें यासाठीं कीं शास्त्रापासून मिळणार्‍या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावीं” (रोमकरांस 15:4). “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्हीं विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत” (योहान 20:31).

3. दु:ख आपल्याला हाताशेवत पवित्र शास्त्रांत शोध घ्यावयांस अधिक उत्कंठीत करते कारण आपण दु:खाला जीवनाशी जुळलेली किरकोळ गोष्टीं मानण्याऐवजी त्याचे समाधान शोधतो. “तुम्हीं मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हां मी तुम्हांला पावेन” (यिर्मया 29:13).

4. दु:ख आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खाचे सहभागी बनविते, ज्यामुळें आपण त्याच्याशी अधिक घनिष्ठ सहभागी ठेवतो आणि या जगाची नश्वरता त्याच्या दृष्टिने अधिक सहजपणें पाहू शकतो. पौलाच्या मनाची उत्कंठा हीं होती कीं त्यानें “तो (ख्रिस्त) व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन ओळख करून घ्यावी” (फिलिप्पैकरांस 3:10).

5. दु:ख फसव्या आणि विचलित करणाऱ्या देहाच्या वासनांना जिवे मारते व आपल्याला अधिकाधिक आध्यात्मिक मार्गनुसारी बनविते व आपल्याला देवाचे आध्यात्मिक वचन ग्रहण करणारें असें लोक बनवते. “ख्रिस्तानें देहाने दुःख सोसले तसेच तुम्हींही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे” (1 पेत्र 4:1). दुःखामध्यें पापाला जिवे मारण्याची शक्ती असते. आणि आपण जितके शुद्ध होत जातो तितकेच आपण देवाला अधिक स्पष्टपणे पाहण्यांस समर्थ होत जातो (मत्तय 5:8).

दु:खाद्वारें देव आम्हांला जें शिक्षण देऊं पाहतो त्याचा आपण द्वेष करूं नये अशी पवित्र आत्मा आम्हांस कृपा पुरवो.

3 फेब्रुवारी : सर्वात मोठी प्रीति

Alethia4India
Alethia4India
3 फेब्रुवारी : सर्वात मोठी प्रीति
Loading
/

मुलांनो, मी तुम्हां लिहितो, कारण त्याच्या नावामुळें तुमच्या पापांची तुम्हां क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

देव “त्याच्या नावामुळें” म्हणजे त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं आम्हांवर प्रेम करतो, आम्हांला क्षमा करतो आणि तारतो यावर भर देणे का महत्वाचे आहे? त्याची कारणे आहेत, त्यांपैकीं दोन येथें सांगितले आहें.

1) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण बायबल यावर भर देते.

मी आपल्याकरितां  तुझे अपराध पुसून टाकितो; मीच तो, तुझी पातकें स्मरत नाहीं (यशया 43:25)

हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं  माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. (स्तोत्र 25:11)

हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठीं आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठीं आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक! (स्तोत्र 79:9)

हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर. (यिर्मया 14:7)

हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्हीं जाणतो; आम्हीं तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. (यिर्मया 14:20-21)

त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला [ख्रिस्ताला]  पुढे ठेवले. ह्यासाठीं कीं, पूर्वी झालेल्यां पापांची देवाच्या सहनशीलतेनें उपेक्षा झाल्यामुळे त्यानें आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे कीं, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. (रोमकरांस 3:25-26)

त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. (1 योहान 2:12)

2) आपण यावर भर देणे कीं देव त्याच्या स्वतःच्या गौरवासाठीं प्रीति करतो आणि क्षमा करतो यामुळें महत्वाचे आहे कारण त्यामुळें हे स्पष्ट होते कीं  देव आपल्यावर मोठे प्रेम करतो.

हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथें माझ्याजवळ असावे; ह्यासाठीं कीं, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा. (योहान 17:24)

देवाची आपल्यावरील प्रीति अशी प्रीति नाहीं कीं जी आपल्याला मोठे बनविते, तर ती अशी प्रीति आहे ज्याद्वारें तो स्वतःचा मोठेपणा दाखवून देतो. स्वर्ग हा आरशांचा प्रेक्षागृह नसून त्याच्या अविनाशी महानतेचा असा दृष्टीक्षेप असेल जिला तुम्हीं जितके अधिक दूरवर पाहाल तितकी दूरवर दिसून येईल. आपण अद्वितीय किंवा मोठे आहों या भावनेनें स्वर्गात जाणें निव्वळ फजिती ठरेल.

सर्वात मोठी प्रीति ह्या गोष्टीची खात्री करून घेते कीं देवच सर्व कांही अशा प्रकारे करतो कीं ज्यामुळें केवळ त्याच्या स्वतःच्या प्रभुत्वाचे सामर्थ्य व गौरवाची स्तुति होते, ह्यासाठीं कीं जेव्हां आपण स्वर्गात जाऊं तेव्हां आपला आनंद बहुगुणीत करणारी एक गोष्ट तेथें असेल: देवाचा गौरव. देवानें आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केलें ही त्याची सर्वांत मोठी प्रीति होय (रोमकरांस 8:32). जेव्हां तो म्हणतो कीं तो आपल्यावर प्रीति करितो व आपल्या नावासाठीं   आमच्या अपराधांची क्षमा करितो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.

2 फेब्रुवारी: पापक्षेमेचें चक्र

Alethia4India
Alethia4India
2 फेब्रुवारी: पापक्षेमेचें चक्र
Loading
/

“आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.” (लूक 11:4)

मुळांत कोण कोणाला आधी क्षमा करतो?

  • एकीकडे, येशू म्हणतो, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.” (लूक 11:4)
  • तर दुसरीकडे, पौल म्हणतो, “प्रभूने तुम्हांला क्षमा केलीं तशी तुम्हींहि करा.” (कलस्सैकर 3:13)

जेव्हां येशू आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकवतो कीं देवानें आम्हांला आमच्या पापांची क्षमा करावी “कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो,” तेव्हां त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा नाहीं कीं क्षमा करण्याचे पहिले पाऊल आम्हीं उचललें होतें. या उलट, अर्थ असा आहे: आम्हीं ख्रिस्तावर पहिल्यांदा विश्वास ठेवला त्यावेळीच देवानें आम्हांला क्षमा केलीं (प्रेषितांची कृत्ये 10:43). मग, या भग्न झालेल्यां, आनंदी, कृतज्ञ, आमचीहि क्षमा करण्यांत आली या आशादायक अनुभवातून, आपणहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो.

ही क्षमाशील भावना असें ठळकपणे प्रकट करते कीं आपल्याला क्षमा करण्यात आली आहे जिचे फळ तारण आहे. म्हणजे, जेव्हां आम्हीं एकमेकांना क्षमा करतो तेव्हां आपल्याठायीं विश्वास असल्याचे दिसून येते; आपण ख्रिस्ताबरोंबर एकरूप झालों आहों; आमच्याठायीं दया करणारा व आम्हांला दीन अंत:करण देणारा पवित्र आत्मा वसतो.

तरी आपण वेळोवेळी पाप करतो (1 योहान 1:8, 10). म्हणून आपण वेळोवेळी ख्रिस्तानें आमच्यासाठीं केलेल्यां प्रायश्चित्ताची नव्याने आठवण ठेऊन देवाकडे वळतो – म्हणजे पुन्हा एकदा पापांची क्षमा मागतो. जर आम्हांमध्यें एकमेकांना क्षमा करणारा आत्मा वस्ती करित नसेल तर आपणहि त्याच्याकडे क्षमायाचनेची मजल मारूं शकत नाही. (मत्तय18:23-35 मधील कृतघ्न (क्षमा न करणाऱ्या) चाकराचा दाखला लक्षात ठेवा. त्याला आपले एक कोटी रुपयाचे देणें माफ केलें गेलें, तरी देखील त्यानें मात्र आपल्या  सोबतीच्या दासाला पंचवीस रुपयाचे येणें माफ करण्यांस नकार दिला. त्यानें आपल्या कृतघ्न आत्म्याद्वारें दाखवून दिलें कीं राजानें त्याच्यावर केलेल्या दयेचा त्याच्यावर कांहीहि प्रभाव पडला नव्हता.)

या मूर्खपणापासून आम्हांला वाचविण्यासाठीं येशूनें आम्हांला अशी प्रार्थना करण्यास शिकविलें कीं, “आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हींहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो” (लूक 11:4). म्हणून येशू म्हणतो कीं आम्हीं यासाठीं क्षमा मागतो कारण आम्हींहि क्षमाशील आहों. हे जणूं असे म्हणणें आहे कीं, ” हे पित्या, ख्रिस्तानें जी दया माझ्यासाठीं विकत घेतलीं आहे ती माझ्यावर कायमस्वरूपी असूं दें, कारण या दयेमुळेंच मला माझे अपराध क्षमा केलें गेलें आहेंत, आणि मी सूड घेणे सोडले आहे, आणि जशी तू माझ्यावर दया केलीं आहेस तशी मीहि इतरांना दया करीन.”

देव करो कीं, देवाची क्षमा काय आहे हें तुम्हीं आज पुन्हा नव्याने जाणून घ्यावें आणि देव करो कीं तुम्हीं एकमेकांना क्षमा करून तुमच्या अंत:करणांत असलेली दया ओसंडून वाहावी. आणि तुमच्या जीवनातील कृपेचा तो गोड अनुभव तुम्हाला तुमच्या तारणाची आणखी खात्री देवो, म्हणजे असें कीं जेव्हां तुम्हीं रक्तानें विकत घेतलेल्या क्षमेचा नव्याने अनुभव घेण्यासाठीं देवाकडे जाल, तेव्हां तुम्हीं जाणून घ्यावें कीं तो तुम्हांकडे स्वतःची एक अशी संतती म्हणून पाहतो जिच्या पापांची क्षमा झाली आहे व जी स्वतःहि इतरांना त्यांचे अपराध क्षमा करते.

1 फेब्रुवारी : करारांत सामावून घेतलेलें

Alethia4India
Alethia4India
1 फेब्रुवारी : करारांत सामावून घेतलेलें
Loading
/

तेथें दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठीं दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्‍यांस लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या शिरीं त्याचा मुकुट झळकेल.” (स्तोत्र 132:17-18)

देवानें दाविदाला दिलेल्या अभिवचनांचा लाभ कोणाला होईल?

आपण स्तोत्र 132:17-18 पुन्हा वाचूं: “तेथें दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठीं दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्‍यांस लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या शिरीं त्याचा मुकुट झळकेल.”

आता त्याची यशया 55:1,3 बरोंबर सांगड घाला, “अहो तान्हेल्यांनो, तुम्हीं सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्हीं या; सौदा करा, खा! . . . आणि मी तुम्हांबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.”

वधस्तंभाच्या या बाजूने, म्हणजे ख्रिस्ताचे मरण, पुरले जाणें, व पुनरुत्थानाच्या घटनांनंतर, मी त्या वचनाचा अर्थ असा घेईन: जो कोणी देवाकडे पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ता द्वारे येतो, आणि आपण कोण आहोत किंवा आपण काय करतो यावर विसंबून न राहता, ख्रिस्तामध्ये देवा बरोबर आपले जे नाते जुळले आहे ती तहान भागविण्यासाठीं येतो, देव त्याच्याशी एक करार करील.

प्रकटीकरण 22:17 मध्ये बायबलचा शेवट कसा होतो हे तुमच्या लक्षात आहे का? “तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.” हे अभिवचन केवळ यशयाच्या काळातील यहुदी मनुष्यासाठीं नव्हतें. हे अभिवचन त्या प्रत्येकासाठीं आहे जो आपल्या आत्म्याची तहान भागवण्यासाठीं ख्रिस्ताकडे येतो. “मी [त्याच्याशी] सर्वकाळचा करार करीन!”

कोणता करार? हा तो करार आहे ज्याचे मूळ देवानें “दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद” यां अभिवचनामध्ये आहे आणि जो सर्वकाळासाठीं स्थिर आहे. यशया 55: 3, “आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.” मी याचा अर्थ असा घेतो कीं दाविदासोबत केलेल्या करारात माझाहि समावेश आहे. दाविदाला जे मिळेल ते मलाहि ख्रिस्त येशूमध्ये मिळेल.

आणि त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

माझ्यासाठीं शृंगातून अंकुर फुटेल. म्हणजेच, एक महासामर्थ्य माझ्यासाठीं लढा देईल आणि माझे रक्षण करेल. माझ्यासाठीं देवानें मांडलेला दीप उदयांस येईल. म्हणजेच माझ्या चोहींकडे प्रकाश असेल आणि यापुढे अंधकाराची सत्ता माझ्यावर चालणार नाही. माझ्या शिरीं एक मुकुट झळकेल. म्हणजे, मी दाविदाच्या पुत्रासोबत राज्य करीन आणि त्याच्यासोबत त्याच्या राजासनावर बसेन. “जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन” (प्रकटीकरण 3:21).

दाविदाला जे अभिवचन देण्यांत आलें त्याचा लाभ आपल्याला देखील व्हावा ही गोष्ट आम्हांला आश्चर्याने भारावून टाकणारी आहे. आणि देव खरेंच आम्हांला थक्क करूं इच्छितो. देवाची इच्छा आहे कीं आजचे आपले हे मनन संपण्यापूर्वी आपण तें सामर्थ्य आणि अधिकार आणि खात्री पाहून ज्यां द्वारें त्यानें आपल्यावर प्रीति केलीं, चकित व्हावें.