5 जानेवारी: आमचा नांगी नसलेला शत्रू

Alethia4India
Alethia4India
5 जानेवारी: आमचा नांगी नसलेला शत्रू
Loading
/

जे तुम्हीं आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्यानें मेलेले होतां त्या तुम्हांस त्यानें त्याच्याबरोंबर जिवंत केलें, त्यानें आपल्या सर्व अपराधांची क्षमा केलीं; आपल्याविरुद्ध असलेलें म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेलें विधींचे ऋणपत्र त्यानें खोडलें व वधस्तंभाला खिळून त्यानें ते रद्द केलें. त्यानें सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केलें. (कलस्सैकरांस 2:13-15)

‘ख्रिस्ताबरोंबर एक होणे’ ह्याचा विश्वासनाऱ्यांसाठीं खूप मोठा बदल घडून येतो याचें कारण म्हणजें हे कीं ख्रिस्तानें कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर सैतानावर निर्णायक म्हणजें अंतिम विजय मिळविला. त्यानें सैतानाला ह्या जगातून बाहेर काढून टाकलें नाहीं, तर त्यानें त्याच्या हातांतून मरणदंडाचे शस्त्रच हिसकावून त्याला कायमचे नि:शस्त्र केलें.

आता तो विश्वासणाऱ्यांवर अशा कोणत्याहि पापाचा आरोप लावू शकत नाहीं ज्याची क्षमा नाहीं. तोच एक असा आरोप आहे जो आपला नाश करूं शकतो. आणि म्हणूनच, तो आपला पूर्णपणे विनाश करण्यांस असमर्थ आहे. तो आपल्याला शारीरिक इजा करूं शकतो व आपल्या भावना दुखावू शकतो – इतकेंच काय, तर तो आपल्याला जिवें सुद्धा मारू शकतो. तो आपल्याला परीक्षेंत पाडू शकतो आणि लोकांना आपल्याविरुद्ध चिथावू शकतो. पण तो आपला नाश करूं शकत नाही.

कलस्सैकरांस 2:13-15 मधील निर्णायक विजय “आपल्या विरुद्ध असलेलें म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेलें विधींचे ऋणपत्र” वधस्तंभाला खिळिलें गेलें या वस्तुस्थितीमुळे झाला आहे. सैतानाने विधींच्या त्या ऋणपत्राला आपल्याविरुद्ध मुख्य आरोपपत्र बनविलें होते. पण तो स्वर्गाच्या न्यायसभेंत सादर करू शकेल असें कोणतेही आरोपपत्र आता त्याच्याकडें नाहीं. एक गोष्ट जी त्याला आपल्या विरोधांत प्रमुखपणे करायची होती तीच करण्यांस आता तो असहाय्य आहे: आम्हांला मरणदंडास पात्र ठरविणें. आता तो तसें शकत नाही. ख्रिस्तानें आमचा मरणदंड स्वतःवर घेतला. सैतान नि:शस्त्र झाला.

हे आपण आणखी एका पद्धतीने मांडू शकतो, ते म्हणजे इब्रीलोकांस पत्र 2:14-15 मध्ये असलेलें शब्द : “[ख्रिस्त मानव बनला] हेतु हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणानें शून्यवत करावें, आणि जे मरणाच्या भयानें आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावें.”

मृत्यू आजहि आपला शत्रू आहे. पण त्याला दुर्बळ करण्यांत आलें आहें. त्या सर्पाचे विष पिळून काढून टाकण्यांत आलें आहें. त्याची प्राणघातक नांगी तोडून टाकण्यांत आली आहें. मरणाची नांगी तर पाप होते, आणि नियमशास्त्राची अट पापाचे बळ होते. परंतु ख्रिस्ताचा धन्यवाद असों ज्यानें नियमशास्त्राच्या अटी पूर्ण केल्या. “अरे मरणा, तुझा विजय कोठें? अरे मरणा, तुझी नांगी कोठें?” (1 करिंथ 15:55).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *