तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आलें कीं, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्हीं आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. (प्रकटीकरण 6:11)
ख्रिस्ती धर्माची जवळजवळ तीनशे वर्षांची प्रारंभिक वाढ ही हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेल्या मातीतून झाली.
सम्राट ट्राजन (सन सुमारे 98), ह्याच्या कारकिर्दीचा आरंभ होईपर्यंत छळ जरी कायदेशीर नव्हता तरी त्याची मोकळीक होती. सम्राट ट्राजनच्या कारकिर्दीपासून ते सम्राट डेशियसच्या कारकिर्दीच्या आरंभापर्यन्त (सन सुमारे 250 AD), छळ कायदेशीर झालेंला होता. डेशियस, जो ख्रिस्ती लोकांचा द्वेष करत होता आणि ज्याला त्याच्याद्वारे करण्यांत येणाऱ्या बेकायदेशीर सुधारणांवर त्यांच्या प्रभावाची धास्ती होती, ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभापासून ते सन 311 मध्यें धार्मिक सहिष्णुतेचा प्रथम कायदा येईपर्यंत, ख्रिस्ती लोकांचा छळ केवळ कायदेशीरच नव्हता, तर सर्वत्र व्यापक आणि सामान्य झालेंला होता.
एका लेखकाने या तिसऱ्या कालखंडातील परिस्थितीचे वर्णन पुढील शब्दांत केलें :
मंडळ्यांमध्यें सर्वत्र दहशत पसरली होती; आणि लॅप्सीची संख्या [ज्यांनी आपला जीव वाचविण्यासाठीं विश्वासापासून माघार घेतली होती] . . . फार मोठी होती. तरी, जे विश्वासांत खंबीरपणें टिकून राहिले आणि ज्यांनी शरण जाण्याऐवजी हौतात्म्य पत्करले, अशांची संख्या पण कमी नव्हती; आणि, छळ जसजसा व्यापक आणि तीव्र होत गेला, तसतसा ख्रिस्ती लोकांचा उत्साह आणि त्यांची प्रतिकार-शक्ती अधिकाधिक बळकट होत गेली.
या प्रमाणें, त्यां तीनशे वर्षांच्या काळांत ख्रिस्ती असणें हा जीवन आणि संपत्ती व कुटुंब यांसाठीं प्रचंड धोकादायक विश्वास होता. आपण कोणत्या गोष्टींवर अधिक प्रीति करतो याची ही परीक्षा होती. आणि या परीक्षेचा टोकाचा बिंदू म्हणजें हौतात्म्य पत्करणें.
आणि त्या हौतात्म्यपणावर एक अशा सार्वभौम देवाचे वर्चस्व होते ज्याने म्हटलें कीं त्यां हुतात्म्यांची संख्या ठराविक आहे. मंडळीरोपण करणें आणि तिला सुदृढ करणें यांत त्यांची विशेष भूमिका आहे. सैतानाचे तोंड बंद करण्यात त्यांची विशेष भूमिका आहे, जो सतत म्हणतो कीं देवाचे लोक त्याची सेवा केवळ यामुळें करतांत कारण त्यांचे जीवन सोयीस्कर आहे. ईयोब 1:9-11 चा हाच मुद्दा आहे.
हौतात्म्य ही काहीं अपघाती गोष्ट नाहीं. ही एखादी अशी गोष्ट नाहीं जी घडून आल्यावर स्वतः देव चक्रावून जातो. ती अनपेक्षित घटना नाहीं. आणि नक्कीच ही गोष्ट ख्रिस्ताचा प्रचार करण्यासाठीं तयार करण्यांत आलेंल्यां धोरणाचा पराभवहि नाहीं.
हौतात्म्य कदाचित पराभव वाटू शकतो. परंतु हा स्वर्गात आखलेल्या योजनेचाच भाग आहे ज्याची कल्पना कोणत्याही मानवी रणनीतीकाराने कधीहि केलीं नाहीं किंवा ज्याची रचना तो कधीहि करू शकणार नाहीं. आणि जे देवाच्या त्या कृपेवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत टिकून राहतांत जी त्यांच्यासाठीं सर्व बाबतींत पुरेशी आहे ते सर्व ह्या योजनेंत विजयी होतांत.