28 March : जेव्हां सर्व तुम्हांला सोडून जातात

Alethia4India
Alethia4India
28 March : जेव्हां सर्व तुम्हांला सोडून जातात
Loading
/

माझ्या पहिल्यां जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्यानें मला शक्ती दिली; आणि त्यानें मला सिंहाच्या जबड्यातूनमुक्त केलें. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्यां स्वर्गीय राज्यात घेण्यासाठीं तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (2 तीमथ्य 4:16-18)

आज सकाळी मी या उदात्त आणि कष्टदायक शब्दांवर रेंगाळत होतो. पौल रोममध्यें तुरुंगात होता. आतापर्यंत आम्हीं जाणतो कीं, त्याला कधीही सोडण्यात आले नाहीं. त्याच्या शेवटच्या पत्राचा अशाप्रकारे अंत होतो.

विचार करा आणि विस्मित व्हा!

त्याला सोडून देण्यात आले आहे : “माझ्या बाजूस कोणी नव्हता.” तो एक वयोवृद्ध माणूस आहे. एकनिष्ठ सेवक. विदेशी नगरात, घरापासून दूर. शत्रूंनी घेरलेला. मृत्यूचा त्याला धोका आहे. का? उत्तर : यासाठीं कीं त्यानें आमच्या निराश झालेल्यां, भयभीत, अथवा एकाकीं जीवासाठीं तो हे बहुमूल्य वाक्य लिहावे, “तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला!

अहाहा, मला ही वचनें किती प्रिय वाटतात! जेव्हां तुमचे जवळचे मित्र तुम्हांला सोडून जातात, तेव्हां तुम्हीं देवाचा धावा करता काय? मग, तुमच्या जीवनातील लोक खरोखर तुमचे देव आहेत का? किंवा तुम्हांस या उदात्त सत्यामध्यें धाडस प्राप्त होते का : “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय 28:20) – मग तुम्हांला कोणीही का सोडेना? तुम्हीं देवाच्या या कठोर शपथेने तुमच्या अंतःकरणास बळ देता का? “मी तुला सोडून जाणार नाहीं व तुला टाकणार नाहीं” (इब्री 13:5)?

मग आपण म्हणू या, “तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला!”

प्रश्न : 2 तीमथ्य 4:18 मध्यें कोणत्या गोष्टीची भिती होती? उत्तर : पौल प्रभूचे स्वर्गीय राज्य प्राप्त करू शकणार नाहीं! पण ही भिती असतांनाहीं पौल ओरडतो, “प्रभू… मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणील.”

प्रश्न : गमावण्याची भिती घालण्यात आलेले स्वर्गीय राज्य पौल कसे प्राप्त करणार होता? उत्तर : “दुष्कृत्ये.” “प्रभू मला प्रत्येक दुष्कृत्यापासून  वाचविल आणि मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणील.”

प्रश्न : एखादे दुष्कृत्य (दुष्ट योजना) पौलाच्या स्वर्गीय राज्य प्राप्त करण्यास कसे भिती घालू शकत होते? उत्तर : त्याला आज्ञाभंगास भाग पाडून ख्रिस्ताप्रत निष्ठा सोडून देण्याच्या मोहांत घालण्याद्वारें.

प्रश्न : हा मोह “सिंहाचा जबडा “ होता का ज्यातून त्याला सोडविण्यात आले होते? उत्तर : होय. “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा” (1 पेत्र 5:8-9).

प्रश्न : मग पौल या सैतानी मोहास बळी न पडता विश्वास आणि आज्ञाधारकतेने शेवटपर्यंत धीर धरून राहिला याचे गौरव कोणाला प्राप्त होते? उत्तर : “त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे” (1 पेत्र 5:10). “त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन” (2 तीमथ्य 4:18).

प्रश्न : का? खंबीरपणे उभा राहणारा पौल नव्हता का? उत्तर : “प्रभू माझ्या बाजूला उभा राहिला आणि त्यानें मला सामर्थ्य दिले!”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *