देवाच्या निवडलेल्यां लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. (रोम 8:33)
पौल येथें असेहि म्हणू शकला असता, “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील?” आणि मग त्यानें उत्तर दिले असते, “कोणीही नाही! आम्हीं नीतिमान ठरलो आहोत.” ते खरे आहे. पण त्यानें जे म्हटलें त्याचा तो शेवट नाही. त्याऐवजी त्याचे उत्तर आहे, “देवच नीतिमान ठरवणारा आहे.”
जोर कृतीवर नव्हे तर कृती करणाऱ्यावर आहे.
का? कारण न्यायालये आणि कायदे यांच्या जगात ही भाषा जिथून येते, त्यानुसार एखाद्या न्यायाधीशाद्वारें करण्यांत आलेली निर्दोष सुटका वरिष्ठ न्यायाधीशाद्वारे रद्द केलीं जाऊ शकते.
जर स्थानिक न्यायाधीश तुम्हीं दोषी असतांना, तुम्हाला दोषमुक्त करतो, पण जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तुमच्याविरूद्ध आरोप लावण्याचा अधिकार असेल, तर मग काय? जर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश तुम्हीं दोषी असतांना, तुम्हाला दोषमुक्त करतो, पण जर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश तुमच्याविरूद्ध आरोप लावू शकत असेल, तर मग काय?
मुद्दा हा आहे : देवाच्यावर, कुठलेही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय नाही. जर देवच तुम्हाला दोषमुक्त करणारा असेल – तुम्हाला त्याच्या दृष्टीत नीतिमान घोषित करीत असेल – तर कोणीही तुमच्या विरुद्ध नवी याचिका दाखल करू शकत नाही; कोणीही तांत्रिकतेत दोष असल्याचा दावा करू शकत नाही; कोणीही फिर्याद करू शकत नाही; कोणीही तुमच्याविरुद्ध अन्य दोषारोप आणू शकत नाही. देवाचा निर्णय अंतिम आणि परिपूर्ण आहे.
जे कोणी येशूवर विश्वास ठेवतात, आणि ख्रिस्ताशी एकरूप होतात, आणि स्वतःला निवडलेल्यांसोबत दाखवितात, त्यांनी हे ऐका : तुम्हाला नीतिमान ठरविणारा देव आहे. मानवी न्यायाधीश नाही. मोठा संदेष्टा नाही. स्वर्गातून येणारा आद्यदूतहि नाही. पण जगाचा निर्माता देव, आणि सर्व वस्तूंचा स्वामी आणि विश्वाचा आणि त्यातील प्रत्येक अणूरेणूंचा आणि व्यक्तीचा नियंता, देवच तो आहे जो तुम्हाला नीतिमान ठरवितो. मुद्दा हा आहे : भयंकर दुःख सहनातही अढळ सुरक्षितता. जर देव आमच्या पक्षास आहे, तर कोणीही आमच्याविरुद्ध यशस्वी दोषारोप घेऊन येऊ शकत नाही. जर देवानें आमच्यासाठीं त्याचा पुत्र दिला, तर तो जे काही चांगले आहे ते सर्व आमच्यासाठीं देईल. जर आम्हांला नीतिमान ठरविणारा देव आहे, तर आमच्याविरुद्ध कुठलाही दोषारोप टिकू शकत नाही.