“अहों येशू, आपण आपल्यां राजाधिकारानें याल तेव्हां माझी आठवण करा.” (लूक 23:42)
आपल्या आशेला जिवे मारणाऱ्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकीं एक म्हणजे ही निराशा कीं आपण स्वतःला बदलण्यासाठीं इतके दिवस प्रयत्न केलें, तरी यशस्वी होऊं शकलों नाहीं.
तुम्हीं मागे वळून पाहता आणि विचार करतां : माझ्यां यां सर्व धावपळीचा काय उपयोग? जीवनाच्या शेवटल्या घटकेला जरी माझे पुनरुज्जीवन झालें, तरी नवी उत्पत्ती म्हणून नव्यां मार्गाने जीवन जगण्यासाठीं माझ्याकडे इतका अल्प काळ असेल कीं इतक्या वर्षांच्या अपयशाच्या तुलनेत यां अल्पकालिक नव्या जीवनाचा फारसा फरक पडणार नाही.
एकेकाळचा दरोडेखोर (म्हणजे येशूच्या बाजूला वधस्तंभावरील चोर) त्याच्या आत्म-परिवर्तनानंतर पुढील कांही तास जगला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो बदलला होता. तो त्यां वधस्तंभावर असतांना त्यानें एक नवी वृत्ती व पश्चातापांस शोभेल असें नवें सत्कृत्य म्हणून एक नवा मनुष्य म्हणून जगला (आता तो ख्रिस्ताची निंदा करित नव्हता). पण त्याचे 99.99% आयुष्य वाया गेले. नव्यां जीवनाचे ते शेवटचे दोन तास महत्त्वाचे होते का?
होय, त्यांचं प्रचंड महत्त्व होते. एकेकाळी दरोडेखोर असलेल्या ह्या लुटारूला, आपणां सर्वांप्रमाणेच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट व्हावें लागेल ह्यासाठीं कीं त्यानें आपल्या जीवनांत केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा. “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झालें पाहिजे, ह्यासाठीं कीं, प्रत्येकाला, त्यानें देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो” (2 करिंथ 5:10). त्या दिवशी त्याचे जीवन त्याच्या नवीन जन्माची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकतेची साक्ष कशी देईल? ख्रिस्तामध्ये त्याचे जीवन नवे झालें होते याची खात्री कशी केलीं जाईल?
शेवटचे तास तो वृत्तांत कथन करतील. हा मनुष्य नवा होता. त्याचा विश्वास खरा होता. तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे. तो ख्रिस्ताचे नीतिमत्व असा झाला आहे. त्याच्या पापांची क्षमा झालीं आहे.
शेवटचा न्याय होईल त्यांवेळी त्याच्या तारणाची ती शेवटची घटका ह्यांच गोष्टीची साक्ष देईल. तो बदलला आहे! आणि त्याचा बदल महत्त्वाचा ठरला. देवाच्या कृपेच्या सामर्थ्याची आणि त्याच्या विश्वासाची आणि ख्रिस्तासोबतच्या त्याच्या एकात्मतेची ती एक सुंदर साक्ष होती आणि कायम असणार.
आता आपण बदललेल्या जीवनाच्या आपल्यां मूळ संघर्षाकडे परत येऊ. मी असे म्हणत नाही कीं जे विश्वासणारे परिवर्तनाच्या बाबंतीत संघर्ष करतांत तें त्यां दरोडेखोरा प्रमाणें तारलेलें नाहींत. मी फक्त असे म्हणत आहे कीं जीवनाच्या शेवटच्या वर्षांचे व शेवटच्या तासांचे महत्त्व आहे.
जर आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या अगदी एक टक्के शिल्लक असलेल्या घटकेतहि, आपण आपल्या पापी प्रवृत्तीवर किंवा अधर्मावर विजय मिळविला जें आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलवर होते किंवा दीर्घकाळापासून होते, तर ही गोष्ट वर्तमान समयी आम्हांवर झालेंल्या कृपेच्या सामर्थ्याची एक सुंदर साक्ष ठरेल; आणि ख्रिस्तावर आपण विश्वास ठेविला आहे आणि त्याच्याबरोबर एकरूप झालो आहोंत ही वास्तविकता शेवटचा न्याय केला जाईल त्यावेळी साक्षीदार ठरेल.
ह्यास्तव, तुम्हीं जे संघर्ष करित आहां तें तुम्हीं धीर धरा. विनंत्या करित रहा, शोध करित रहा, दार ठोकत रहा. ख्रिस्ताकडे पाहत असा. अगदी शेवटच्या घटकेंत दरोडेखोरांचे तारण करून जर देवाला गौरव मिळत असेल, तर तुम्हीं जे वर्षानुवर्षे पुनरुज्जीवन मिळविण्यासाठीं झटत होता ते देण्यासाठीं तो आत्तापर्यंत का थांबून होता ह्यामागे निश्चितच त्याचे कांही हेतू आहेत.