तेथे असताना असे झालें कीं, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्यानें गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. (लूक 2:6-7)
तुम्हीं विचार कराल कीं जर देव जगावर अशाप्रकारे राज्य करतो कीं तो मरीया आणि योसेफाला बेथलेहेमात आणण्यासाठीं पूर्ण साम्राज्यात जनगणनेचा आदेश अस्तित्वांत आणतो, तर मग त्यानें निश्चितच ह्या गोष्टीची देखील खात्री करून घ्यायला पाहिजें होती कीं उतारशाळेत त्यांच्यासाठीं जागा उपलब्ध असावी.
होय, तो ह्या गोष्टीची देखील खात्री करून घेऊ शकला असता. तो नक्कीच तसें करू शकला असता! आणि येशूचा जन्म श्रीमंत कुटूंबात होणें शक्य होते. त्याला अरण्यात धोंड्यांपासून भाकरी बनविणेंहि शक्य होते. त्याला गेथशेमाने बागेत त्याच्या मदतीसाठीं 10,000 देवदूतांना बोलावणें शक्य होते. तो वधस्तंभावरून उतरून खाली येऊ शकला असता आणि स्वतःला वाचवू शकला असता. प्रश्न हा नाहीं कीं देव काय करू शकला असतां, पण त्यानें काय करण्याचे ठरविलें होते हा आहे.
देवाची इच्छा ही होती कीं ख्रिस्त जरी धनवान होता, तरी त्यानें तुमच्यासाठीं तो दरिद्री व्हावें. बेथलेहेमातील कोणत्याच उतारशाळेत “जागा नव्हती” ही तुम्हांला खूण होती. “तो तुमच्याकरिता दरिद्री झाला” (2 करिंथ 8:9).
तो त्याच्या लेकरांसाठीं सर्व गोष्टींवर – मग ते होटेल्स, असोत, वा विमानें- राज्य करतो. त्याचा कलवरीचा प्रवास बेथलेहेमात “जागा नव्हती” या चिन्हाने सुरू होतो आणि त्याचा शेवट यरूशलेमातील वधस्तंभावर थूंकणें आणि थट्टा करणें याने होतो.
आणि त्यानें जें म्हटलें तें आम्हीं हे विसरता कामा नये, कीं “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्यानें आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (लूक 9:23).
आम्हीं कलवरीच्या मार्गावर त्याला अनुसरतो आणि त्याला हे म्हणतांना ऐकतो, “दास धन्यापेक्षा मोठा नाहीं’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील” (योहान 15:20).
जो उत्साहाने म्हणतो, “आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन” त्याला येशू उत्तर देतो, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाहीं” (लूक 9:57-58).
होय, येशूच्या जन्माच्या वेळी त्याला खोली मिळावी याविषयी देव खात्री करून घेऊ शकला असतां. पण ते कलवरीच्या मार्गावरून वळसा म्हणजें माघार घेणें झालें असते.