31 July : संकटे जे विश्वासाला चिरडून टाकतांत

Alethia4India
Alethia4India
31 July : संकटे जे विश्वासाला चिरडून टाकतांत
Loading
/

“तथापि त्यांच्यामध्यें मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतांत; मग वचनामुळें संकट आलें किंवा छळ झाला म्हणजें ते लगेच अडखळतांत.” (मार्क 4:17)

दु:खें येतांत तेव्हां काहींचा विश्वास टिकाव धरण्याऐवजी तो अडखळतो. येशू हे जाणून होता; त्यानें पेरणी करणार्‍याचा जो दाखला दिला त्यांत त्यानें हे समजावून सांगितलें. काहीं लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतांत, परंतु संकटे येताच ते विश्वासापासून पतन पावतांत.

यास्तव, संकटे आणि दु:खें यांमुळें प्रत्येक प्रसंगी विश्वास मजबूतच होतो असें नाहीं. कधी कधी संकटे आणि दु:खें विश्वासाला चिरडून टाकतांत. आणि मग येशूचे गोंधळ उडवणारे हे शब्द खरे ठरतांत, “ज्या कोणाजवळ नाहीं त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल” (मार्क 4:25).

आपण भावी कृपेवर दृढ विश्वास ठेवून दु:ख सहन करावें याचे हे आव्हान आहे, जेणेंकरून आपला विश्वास अधिक दृढ व्हावा व तो व्यर्थ ठरू नये (1 करिंथ 15:2). “ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिलें जाईल” (मार्क 4:25). आपल्यावर संकटे आणण्यामागे असलेला देवाचा हेतू जाणून घेणें हे संकटांद्वारे विश्वासात वाढण्याचे एक मुख्य साधन आहे.

जर तुम्हांला असं वाटत असेल कीं तुमच्यावर येणारे संकट व दुःख निरर्थक आहेत, किंवा तें देवाच्या नियंत्रणात नाहींत, किंवा तो लहरी किंवा क्रूर आहे, तर तुमचे संकट व दुःख हे तुम्हांला इतर सर्व गोष्टींपासून दूर पळ काढून देवाकडें धाव घेण्यांस प्रवृत्त करण्याऐवजी -कारण असेच व्हायला पाहिजें- ते तुम्हांला देवापासून दूर नेतील. म्हणून, आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हां हा विश्वास ठेवणें देखील महत्वाचे असते कीं तो ह्या कृपेचा पुरवठा दु:खाद्वारे सुद्धा करतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *