तुमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटानें फेड करणें आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्यांबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयीं ते होईल; तो आपल्यां सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेंसहित प्रकट होईल; तेव्हां जे देवाला ओळखत नाहींत व आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहींत त्यांचा तो सूड उगवील. (2 थिस्सल 1:6-8)
अशी वेळ येईल जेव्हां देवाचा धीर समाप्त होईल. जेव्हां देव ठरविलेंल्या समयापर्यन्त त्याच्या लोकांना दुःख सोसतांना पाहून चुकेल, आणि रक्तसाक्षींची ठरविलेंली संख्या पूर्ण होईल (प्रकटीकरण 6:11), तेव्हां न्याय व पवित्र सूड स्वर्गातून प्रकट होईल.
लक्ष द्या कीं जे लोग देवाच्या लोकांवर जुलूम करतांत त्यां लोकांवर जेव्हां देवाचा सूड येतो त्याला आपण “विश्रांती” म्हणून साजरा करूं. “तुमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटानें फेड करणें आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्यांबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे.” दुसऱ्या शब्दांत, “आमच्यांवर संकट आणणाऱ्या लोकांवर” न्याय आमच्यांसाठीं कृपेचेच एक स्वरूप आहे.
कदाचित कृपेच्या रूपात न्यायाचे अतिशय अप्रतीम चित्र प्रकटीकरण 18 मध्यें बाबेलच्या विनाशाचे चित्र आहे. तिच्या नाशाच्या वेळी, स्वर्गातून एक मोठी वाणी ऐकू येते, ‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयीं ‘आनंद करा;’ कारण देवानें तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे”’ (प्रकटीकरण 18:20). ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेंलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत; कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीनें आपल्यां जारकर्मानें पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्यानें केला आहे, आणि आपल्यां ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे” (प्रकटीकरण 19:1-2).
जेव्हां देवाचा धीर व त्याची सहनशीलता संपुष्टात येईल, आणि हे युग समाप्त होईल, आणि देवाच्या लोकांच्या शत्रूंवर न्याय ओढवेल, तेव्हां पवित्र लोक देवाचा न्याय अमान्य करणार नाहींत.
याचा अर्थ हा आहे कीं पश्चात्ताप न करणाऱ्यांचा अंतिम नाश देवाच्या लोकांसाठीं दुखाचा अनुभव नसेल.
इतरांची पश्चात्ताप न करण्याची इच्छा संतांचे प्रेम ओलीस ठेवणार नाहीं. नरक स्वर्गाला धमकीं देऊन दुःखी करूं शकणार नाहीं. देवाचा न्याय मान्य केला जाईल आणि संतांना मोठी कृपा म्हणून सत्याचे प्रमाणीकरण अनुभवता येईल.