तेव्हां शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केलें आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्यां शब्दाचे उल्लंघन केलें आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणें ऐकलें. (1 शमुवेल 15:24)
शौलानें देवाचे म्हणणें ऐकण्याऐवजी लोकांचे म्हणणें का ऐकलें? कारण त्याला देवाऐवजी लोकांची भीती होती. त्याला अवज्ञेच्या दैवीय परिणामांची जितकीं भीती होती त्यापेक्षा अधिक भीती आज्ञापालनानें पुढे मानवीय परिणाम काय होतील याची होती. देवाच्या नाराजीपेक्षा त्याला लोकांच्या नाराजीचे अधिक भय होते. आणि हा देवाचा फार मोठा अपमान आहे.
वस्तुतः, यशया म्हणतो कीं देवाच्या अभिवचनांकडें दुर्लक्ष करून मनुष्य काय करूं शकतो याची भीती धरणें एक प्रकारचा अहंकार आहे. तो ह्या मर्मभेदी प्रश्नानें देवाचे शब्द उद्धृत करतो: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण? परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?” (यशया 51:12-13).
मनुष्याचे भय गर्वासारखे वाटत नसेल, पण देव म्हणतो कीं ते आहे, “तू मनुष्याला, मानवपुत्राला भितेस अशी तू कोण! परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस?”
मुद्दा हा आहे : जर तुम्हीं मनुष्याचे भय धरता, तर तुम्हीं देवाच्या आणि त्याचा पुत्र, येशू याच्या पवित्रतेचा, त्याच्या मूल्याचा नाकार करणें सुरू केलें आहे. देव मनुष्यापेक्षा अतिशय बलवान आहे. तो अत्यंत बुद्धीमान आणि प्रतिफळ आणि आनंद यांनी अमर्यादपणें परिपूर्ण आहे.
मनुष्य काय करूं शकतो या भीतीनें त्याजकडें पाठमोरे होण्याचा अर्थ देव जे त्याचे भय बाळगतात त्यांच्यासाठीं जे अभिवचन देतो ते सर्व फेटाळून लावणें होय. हा मोठा अपमान आहे. आणि अशा अपमानामुळें देव प्रसन्न होऊ शकत नाहीं.
दुसरीकडें, जेव्हां आपण देवाची अभिवचनें ऐकतो आणि आमच्यां अविश्वासामुळें देवाची निंदा होईल या भीतीनें त्याच्यावर धैर्यानें विश्वास ठेवतो, तेव्हां त्याला खूप आदर मिळतो. आणि त्यात त्याला खूप खूप आनंद होतो.