
मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही.” (प्रेषितांची कृत्ये 23:12)
त्या भुकेल्या लोकांचे काय झालें, ज्यांनी पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही अशी शपथ घेतलीं होती?
आपण त्यांच्याविषयीं प्रेषितांची कृत्ये 23:12 मध्ये वाचतो, “मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्हीं खाणारपिणार नाही.” पण तसें झालें नाही. का? कारण अनपेक्षित घटना घडल्या.
- तें कट करित असतांना तिथें दबा धरून बसलेल्या एका तरुणाने तें ऐकलें.
- हा तरुण पौलाचा भाचा होता.
- त्यां तरुणाने पौलाचे रक्षण करणाऱ्या रोमन शताधिपतीकडे जाण्याचे धाडस केले.
- त्यां शताधिपतीनें त्याचे वृत्त गांभीर्याने घेतले आणि त्याला सरदाराकडे आणले.
- सरदाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पौलाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठीं “दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी” तयार केले.
प्रत्येक घटना अत्यंत अशक्य अशी होती. आश्चर्यच. पण असच झालं.
कोणती गोष्ट घातपात करण्यासाठीं दबा धरून बसलेल्यां त्यां भुकेल्या माणसांच्या लक्ष्यांत आलीं नव्हतीं? त्यांनी कट रचण्याआधीच पौलाचे काय झालें याचे आकलन करण्यात ते अपयशी झालें. प्रभूने तुरुंगात पौलाला दर्शन देऊन म्हटलें, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” (प्रेषितांची कृत्ये 23:11).
ख्रिस्तानें म्हटलें कीं पौल रोम शहरांत जात आहे. आणि तेच होणार होते. ख्रिस्ताच्या अभिवचनाविरुद्ध कोणताही घातपाताचा कट यशस्वी होऊ शकत नाही. रोम नगरांत येईपर्यंत पौल अमर होता. त्याची अंतिम साक्ष देणें बाकीं होते. आणि पौल ती देईल ह्याची खात्री स्वतः ख्रिस्त करणार होता.
तुमचीही अंतिम साक्ष आहे जी देणे तुम्हांला अगत्याचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हीं ती देत नाही तोपर्यंत तुम्हीं अमर आहां.
Amen
Amen