आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!” (नीतिसूत्रे 22:13)
मी अपेक्षा केली नव्हती कीं नीतिसूत्र असें म्हणेंल. मी अपेक्षा केली होती कीं ते असें म्हणेंल, “भेकड व्यक्ति म्हणतो, “बाहेर सिंह आहे! भर रस्त्यावर मी ठार होईन!” पण इथे “आळशी” म्हंटलें आहे “भेकड” नाहीं. त्यामुळें इथे नियंत्रित करणारी (विल्हेवाट लावणारी) भावना आळशीपणा आहे, भीती नाहीं.
पण आळशीपणाचा आणि रस्त्यावर असणार्या सिंहाच्या धोक्याच्या काय संबंध? आपण नेंहमी असें म्हणत नाहीं कीं, “हा माणूस इतका आळशी आहे कीं तो बाहेर कामं करायला जाऊ शकत नाहीं, कारण रस्त्यात सिंह आहे.”
मुद्दा हा आहे कीं, आळशी माणूस आपल्यांला काम करावे लागू नये म्हणून, मनात काल्पनिक परिस्थिति निर्माण करतो, आणि त्याच्या आळशीपणा वरून लक्ष विचलित करण्यासाठीं सिंहाचा धोका असल्याचे कारण देतो. त्याचे दिवसभर घरी बसणें कोणीच मान्य करणार नाहीं. पण रस्त्यात सिंह आहे म्हंटल्यावर ते त्याची परिस्थिती समजू शकतील.
इथे एक गहन पवित्र शास्त्रीय शिकवण जी आपण शिकायला पहिजे ती ही कीं, आपलें मन त्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठीं आपल्यां बुद्धीला भ्रष्ट करते. आपल्यां अंतकरणातील खोल इच्छा आपल्यां बुद्धीच्या तर्कशुद्धपणाच्या गाभाऱ्यात जातात आणि आपल्यां इच्छा जरी चुकींच्या असल्या, तरी त्या चांगल्या आहेत असें आपल्यां बुद्धीला पटवतात.
हेच आळशी व्यक्ति करत आहे. त्याची हीच इच्छा आहे कीं, आपण काहीं काम न करता घरीच बसायचे. पण घरी बसायला त्याच्याकडें काहींच योग्य कारण नसते. मग, तो काय करतो? तो त्याच्या चुकींच्या इच्छांवर, आळशी पणावर मात करतो का? नाहीं, तो त्याच्या इच्छांचे समर्थन करण्यासाठीं मनात खोट्या परिस्थिति निर्माण करतो.
येशू म्हणाला, “निवाडा हाच आहे कीं, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती” (योहान 3:19). आपल्यांला अंधकार प्रिय आहे कारण आपण न उघडकींस येता आपल्यांला जे हवे ते करूं शकतो. ह्या परिस्थिति मध्यें आपलें मन हे अंधकाराचा कारखाना बनून जातो – अर्ध्यसत्य, शंका, दिशाभूल, कुचराई आणि असत्याचा झरा बनतो – आणि आपल्यां मनातील दुष्ट विचार उघडकींस येण्यापासून आणि नाश होण्यापासून रक्षण करूं पाहतो.
विचार करा आणि सुज्ञ व्हा.