“जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीहित्यांना जगात पाठवले.” (योहान 17:18)
नाताळ हा सुवार्ता प्रसारासाठीं एक नमूना म्हणजें आदर्श आहेत. सुवार्ता प्रसाराचे कार्य नाताळाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा आहे. “जसे तू ….तसे मीहि”
उदाहरणार्थ, संकट. ख्रिस्त जे त्याचे स्वकीय त्यांकडें आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाहीं. तसेच तुमच्यांबरोबरहि होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध कारस्थान रचले. तसेच तुमच्यांविरुद्धहि केलें जाते. त्याचे कायमचे घर नव्हते. तुमचेहि नाहीं. त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप लावले. तुमच्यांवरहि लावले जातांत. त्यांनी त्याला चाबकांनी मारले आणि त्याची थट्टा केली. तुम्हांबरोबर तसेच वर्तन केलें जाते. तो तीन वर्षांच्या सेवेनंतर मृत्यू पावला. तुमचाहि मृत्यू होईल.
पण याहिपेक्षा एक अतिशय वाईट संकट आहे ज्यामधून येशू वाचला. तुम्हीं सुद्धा वाचविले जाल!!
16व्या शतकाच्या मध्यकाळात फ्रांसिस झेविअर (1506-1552), यांनी मलाका (आजच्या मलेशियाचा भाग) येथें कार्यरत असलेले फादर पेरेज यांना चीनप्रत त्याच्या सुवार्ता कार्यात ते तोंड देत असलेल्या संकटांविषयी लिहिलें. त्यांनी म्हटलें,
सर्व संकटांपैकीं सर्वात मोठे संकट देवाच्या दयेत आपला भरवसा आणि विश्वास गमावणें आहे… त्याच्यावर अविश्वास करणें कोणत्याही भौतिक वाईटापेक्षा अधिक भयंकर गोष्ट ठरेल जी देवाचे शत्रू एकत्र मिळून आमच्यावर लादू शकतात, कारण देवाच्या परवानगीवाचून दुरात्मे किंवा त्यांचे मानव रुपी सेवक आम्हास थोड्या प्रमाणातही अळखळण आणू शकत नाहींत.
सुवार्तिकांना ज्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते ते संकट मृत्यू नाहीं तर देवाच्या दयेवर अविश्वास बाळगणें आहे. जर ते संकट यशस्वीपणें टाळण्यात आलें, तर इतर सर्व संकटे आपली नांगी गमावतील.
शेवटी देव आमच्या हातात प्रत्येक कट्यारास राजदंड बनवितो. जे.डब्लू. अलेक्झेंडर म्हणतो, “सांप्रतकाळातील कष्टाच्या प्रत्येक क्षणाची गौरवाच्या लक्षावधी युगांनी कृपापूर्णरित्या परतफेड केली जाईल.”
ख्रिस्त या संकटातून निभावून गेला – देवावर अविश्वास करण्याचे संकट. म्हणून देवानें त्याला अत्युच्च केलें! जसे त्याला केलें, तसे तुम्हांलाहि करील.
या नाताळाच्या हंगामांत हे लक्षात ठेवा कीं नाताळ हा सुवार्ता प्रसारासाठीं नमूना व आदर्श आहे. जसे मी, तसे तुम्हीं. आणि त्या कार्याचा अर्थ आहे संकट. आणि सर्वात मोठे संकट देवाच्या दयेवर अविश्वास बाळगणें हे आहे. यास जर तुम्हीं बळी पडला कीं सर्वकाही गमावले, येथें जर जिंकला तर येणाऱ्या लक्षावधी युगानेयुग कोणतीहि गोष्ट तुमचे अहित करू शकणार नाहीं.