हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. (स्तोत्र 42:11)
आपण निराशावादी दृष्टिकोण व उदासीनता -म्हणजें खिन्न झालेंला जीव- यांशी लढा द्यायला शिकण्याची गरज आहे. हा लढा भावी कृपेवरील विश्वासाचा लढा आहे. देव आणि त्यानें भविष्याविषयी जें अभिवचन दिलें आहे त्या सत्याचा आपण स्वतःला उपदेश देऊन हा लढा देत असतो.
स्तोत्रकर्ता स्तोत्र 42 मध्यें हेच करतो. स्तोत्रकर्ता त्याच्या खिन्न झालेंल्यां जीवाला उपदेश देतो. तो स्वतःला धमकावतो व स्वतःशीच वाद घालतो. आणि त्याचा मुख्य युक्तिवाद म्हणजें भविष्यातील कृपा: “देवाची आशा धर! देव भविष्यात तुझ्या निमित्त दर्शन देऊन ज्यां प्रकारे तुझा उद्धार करणार आहे त्यावर विश्वास ठेव. हर्ष-नादाचा दिवस येत आहे. परमेश्वर स्वतः दर्शन देऊन तुला आवश्यक असलेले सर्व सहाय्य पुरवेल. तो सर्वकाळ आम्हांबरोबर राहील असे अभिवचन त्यानें दिलें आहे.”
मार्टिन लॉयड-जोन्स यांना खात्री होती कीं देवाच्या भावी कृपेविषयी स्वतःला सत्याचा उपदेश देण्याविषयीचा हा मुद्दा आध्यात्मिक नैराश्यावर मात करण्यासाठीं अत्यंत निकडीचा आहे. त्यांनी Spiritual Depression नावाचे जे उपयुक्त पुस्तक लिहिलें त्यांत ते पुढीलप्रमाणें असे लिहितांत,
तुमच्या कधी हे लक्षात आलें आहे का कीं तुमच्या जीवनातील दुःख हे मुख्यतः ह्यामुळें आहे कारण तुम्हीं स्वतःशी बोलण्याऐवजी स्वतःचे ऐकत असतां? उदाहरणार्थ, तुम्हीं सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मनात जें विचार येतांत त्यांवर विचार करा. त्यांचा उगम तुमच्यातून झाला नाहीं, तरी ते तुमच्याशी बोलू लागतांत, ते कालचे अनुत्तरीत प्रश्न परत लक्ष्यांत आणतांत. कुणीतरी तुमच्याशी संवाद साधतोय. . . . तुमचा स्व: तुमच्याशी संवाद साधत आहे. आता स्तोत्र 42 मधील या पुरुषाने जे समाधान काढले ते म्हणजें असे कीं तो त्याच्या स्व:ला त्याच्याशी संवाद साधू देण्याऐवजी तो त्या स्व:शी बोलू लागतो. तो विचारतो “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?” त्याचा जीव त्याला खिन्न करत होता, चिरडत होता. म्हणून तो उठतो, आणि म्हणतो, “ हे माझ्या स्व:, जरा ऐक. मी तुझ्याशी जें बोलतो, तें ऐक.” (20–21)
नैराश्याविरुद्ध असलेला आपला लढा देवाच्या वचनांवर विश्वास ठेवण्याविषयीचा लढा आहे. आणि देवाच्या भावी कृपेवरचा विश्वास त्याचे वचन ऐकण्याने येतो. आणि म्हणून स्वतःला देवाच्या वचनातून उपदेश देणें हे या आध्यात्मिक युद्धाचा जीव कीं प्राण आहे.